मुक्ती कोन पथे ? लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आधी उन्नती की आधी धर्मांतर
या ठिकाणी आधी आर्थिक उन्नती की आधी धर्मांतर या प्रश्नाचा ही विचार करणे मला आवश्यक वाटते. उन्नती आधी झाली पाहिजे असे म्हणणाऱ्या लोकांचे मत मला याहय होऊ शकत नाती आधी धर्मातर मग आर्थिक उन्नती किंवा आधी आर्थिक उन्नती मग धर्मातर हा वाद आधी राजकीय उन्नती कि आधी सामाजिक उन्नती या वादासारखा शुष्क आहे. समाजाच्या उन्नतीला अनेक साधनांची आवश्यकता असते व ता सर्वच साधने आपापल्या परी आवश्यक असतात. त्यात अमुक एकाचा उपयोग प्रथम करावयाचा व दुसऱ्याचा उपयोग नंतर व्यवस्था असा अनुक्रम नेहमीच ठेवता येणार नाही परंतु तसा अनुक्रम ठेवावा असाच जो आग्रह असेल तर आधी धर्मातर किंवा आधी आर्थिक उन्नती या प्रश्नाचे उत्तर आधी धर्मातर असेच या म्हणेन. जोपर्यत अस्पृश्यतेचा कलंक तुमच्यावर बसला आहे तोपर्यत तुमचा आर्थिक उन्नती कशी होऊ शकणार हेच मला समजत नाही. दुकानदारी करण्याच्या हेतूने तुम्हापैकी कोणी जर एखादे दुकान घातले व दुकानदार अस्पृश्य आहे असे कळले तर त्याच्यापासून कोणी तुम्हापैकी ही माल घेणार नाही. नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने जर तुम्हा पैकी कोणी एकाने नोकरीकरिता अर्ज केला व अर्जदार अस्पृश्य आहे असे समजले तर त्याला नोकरा मिळणार नाही. कोणाची शेती विकावयाची झाली व तुम्हा पैकी कोणी ती खरेदी करण्याचा विचार केला व मागणी करणारा अस्पृश्य आहे म्हणून समजले तर तुम्हाला ती जमीन कोणी विकणार नाही. आर्थिक उन्नतीचा कोणताही मार्ग तुम्ही स्विकारला तरी अस्पृश्यतेमुळे कोणताही मार्गास तुम्हाला यश प्राप्ती होणार नाही. अस्पृश्यता हि एक तुमच्या उन्नतीच्या मार्गात कायमची धोड आहे. ता सरकविल्या शिवाय तुमचा मार्ग सुकर होऊ शकत नाही व धर्मांतर केल्या शिवाय हा धोड नाहिशी व्हायची नाही. तुमच्यातील काही तरुण लोक आज़ शिक्षणाच्या मागे लागले आहेत आणि या शिक्षणाकरिता जिकडून पेसा मिळेल तिकडून पैसा मिळविण्याचा हे प्रयत्न करीत आहेत. या पेशाच्या लालचिमुळे कित्येकच्या मनात आहोत तेथेचं, अस्पृश्यच राहून उन्नती करून घेण्याकडे प्रवृत्ती दिसून येते. परतुं आशा तरुणांना मी असा एक प्रश्न विचारू इच्छितो कि शिक्षण घेतल्या नंतर तुम्हाला तुमच्या शिक्षणानुरूप नोकरी मिळण्याचा मार्ग जो खुला झाला नाही तर तुम्ही शिक्षण घेऊन काय करणार आहात? आपल्यातील शिकलेल्यां पैकी पुष्कळसे लोक बेकार आहेत त्याचे कारण काय? माझ्या मते या बेकाराचे कारण पुष्कळ अंशानी अस्पृश्यता हेच आहे. अस्पृश्यतेमुळेच तुमच्या गुणांचे चीज होऊ शकत नाहीं अस्पृश्यतेमुळेच तुमच्या लायकीचे लाज होऊ शकत नाही. अस्पृश्यतेमुळेच तुम्हाला लष्करातून कडून टाकण्यात आले. अस्पृश्यतेमुळेच तुम्हाला पोलिसात घेत नाहीत. अस्पृश्यतेमुळेच तुम्ही पट्टेवाल्यांच्या जागा मिळवू शकत नाही. अस्पृश्यतेमुळेच तुम्ही कोना जागेला चटू शकत नाही. अस्पृश्यता हा एक प्रकारचा शाप आहे त्यापासून तुम्ही दग्ध झाला आहात व तुमच्या गुणांची राख रांगोळी झाली आहे. अशा स्थितीत तुम्ही गुण संपादन ते काय करणार ? व केले तरी त्याचा काय उपयोग होणार? तुमच्या गुणांचे काही चीज़ व्हावे, तुमच्या शिक्षणाचा काही उपयोग व्हावा. तुमच्या आर्थिक उन्नतीची द्वारे खुली व्हावीत अशी तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आधी अस्पृश्यता घालविला पहिजे म्हणजेच धर्मांतर केले पाहिजे.