Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

हिंदू धर्मात तुम्हाला सहानुभूती आहे काय ?

मुक्‍ती कोन पथे ?  लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हिंदू धर्मात तुम्हाला सहानुभूती आहे काय ?

     सहानुभूतीच्या दृष्टीने पाहिले तर सर्वत्र शून्यच आहे, असे म्हणावे लागेल. कोठे ही तुम्ही गेलात तरी तुमच्याकडे आपुलकीच्या भावनेने कोणी ही पाहाणार नाही, याचा अनुभव तुम्हाला चांगलाच आहे. आपुलकीचा भावना नाहीच नाही, परंतु हिंदू लोकांकडून तुम्हाला परक्या पेक्षा परके लेखण्यात येते. एकाच गावात राहणारे स्पृश्य आणि अस्पृश्य यांचा परस्पर संबंध कसा हे जर पाहू लागले तर पुजारी शेजारी राहणार दोघे भाऊ असे कोणाला ही म्हणता येणार नाहीं छावणी दिलेले हे दान परस्पर विरोधी सैन्याचे तल आहेत असेच म्हणावे लागेल. जितके मुसलमान लोक हिंदूंना जवळचे वाटतात, त्यांच्याशी जेवढा त्यांचा स्नेहभाव असतो त्याच्या शत्तांशाने देखील तुमच्याशी हिंदूंचा नसतो. हिंदू मुसलमान हे लोकल बोर्डात, कायदे कौन्सिलात व्यापारात एकमेकांना सहाय्यभूत होऊन वागतात; पण तुमच्याशी तसे सहानुभूताने हिंदू लोकांना वागल्याचे एखादे तरी उदाहरण दाखवून देता येईल काय ? उलटपेक्षा त्यांचा तुमच्या विरुद्ध नेहमीचा कटाक्ष असतो, ही गोष्ट मात्र खरा आहे. हिंदूच्या मनात तुमच्या विरुद्ध असलेल्या कटाक्षाचा परिणाम कित्ता विधातक झाला आहे हे तुमच्या पैकी ज्या कोणाला दाद मागण्या करिता कोर्टात जाण्याचा प्रसंग आलेला आहे तो आपल्या अनुपवाने सांगू शकेल. कोर्ट आपल्याला न्याय देईल, पोलीस आपल्याला मदत करील असा तुम्हापैकी कोणा एकाला तरी विश्वास वाटतो का? व तो जर वाटत नाही तर तशा वृत्ती होण्यास काय कारण आहे? माझा मते अशा अविश्वासाच कारण एकच आहे व ते हेच की हिंदू लोकांमध्ये तुमच्या बद्दल कोणत्याही प्रकारचा सहानुभूती नसल्या कारणाने ते आपल्या अधिकार सदुपयोग करतील अशी आशा तुम्हाला वाटत नाही. हे जर खरे आहे तर शत्रुत्वाने भरलेल्या या वातावरणात राहून तुमचा काय उपयोग होणार आहे ?

हिंदू समाजात तुमच्या करिता समता आहे काय ?

Mukti Kon Pathe book written by Dr B R Ambedkar      हा प्रश्न खरोखरीच विचारावयासच नको. अस्पृश्यता हा मूर्तिमंत असमानताच आहे. एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कोठेच दिसावयाचा नाही. अस्पृश्यतेपेक्षा जास्त उद्य स्वरुपाची असमानता जगाच्या इतिहासात अन्य कोठेच सापडणार नाही. कमी अधिक भावामुळे एकाने आपली मुलगी दुसऱ्याच्या मुलाला न देणे, कमी अधिक भावामुळे एकाने दुसऱ्याच्या बरोबर सहभोजन न करणे अशा प्रकारचे असमानतेचे निदर्शक वर्तन आपणास पाहावयास सापडले. परंतु एका माणसाला दुसऱ्या माणसाने न शिवण्या इतका पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्मा खेरीज आणि हिंदू समाजाखेरीज अन्यत्र कोठे तरी सापडेल काय? ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते, ज्याच्या स्पर्शान देव बाटतो, तो प्राणी मानवाच्या कोटीत गणला गेला आहे असे कोणी तरी म्हणेल काय ? अस्पृश्य माणसाकडे पाहण्याची दृष्टी आणि रक्तपितीने भरलेल्या माणसाकडे पाहण्याची दृष्टी यात काय फरक आहे ? रक्तपिती भरलेल्या माणसाबद्दल लोकांच्या मनात किळस जरी असला तरी त्याच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती तरी असते! परंतु तुमच्या बद्दत्न सहानुभूती तर नसतेच पण किळस मात्र असतो. रक्तपिती भरलेल्या माणसापेक्षा देखील तुमची स्थिती हीन आहे. अजून हि खेडेगावात एखादा स्पृश्य माणूस उपास सोडीत असताना जर महाराचा शब्द त्याच्या कानावर पडला तर तो अन्न ग्रहण करीत नाही एवढा कलंक तुमच्या शरीराला, एवढा कलंक तुमच्या शब्दाला आहे! अस्पृश्यता हिंदु धर्मा वरील कलंक आहे असे काही लोक म्हणत आहेत. पण त्या बतवाणीत खर म्हटले असता काही अर्थ नाही हिंदू धर्म कलंकित आहे असे एक ही हिंदू मानीत नाही. तुम्ही कलंकित आहात अपवित्र आहात असे मात्र बहुजन हिंदू समाज मानतो. हि दशा तुम्हाला का प्राप्त झाली हे तुम्ही हिंदु धर्मात राहिल्यामुळे ही दशा तुम्हाला प्राप्त झाली आहे असे मला वाटते. तुमच्यातील जे मुसलमान झाले त्यांना हिंदू अस्पृश्य मानात नाहीत व असमान लेखीत नाहीत. तुमच्यातील जे खिस्ती झाले त्यांना हिंदू अस्पृश्य मानात नाहीत व असमान लेखीत नाहीत. नुकताच त्रावणकोर येथे घडलेला प्रकार विचारात घेण्यासारखा आहे. तेथील थिया जातीतील अस्पृश्य लोकांस रस्त्यावरून चालण्याची मनाई आहे. परवाच त्यांच्या पैकी काही जणांनी शीख धर्म स्वीकारला, हे तुम्हास माहित असेलच. अस्पृश्य असताना ज्या लोकांस त्या रस्त्यावरून चालता येत नव्हते त्याच लोकांना शीख धर्म स्विकारल्या बरोबर त्यांच्या वरची बंदी उडवली गेली. या सर्व गोष्टीवरून एक गोष्ट सिद्ध होत आहे की तुमच्या अस्पृश्यतेला व तुमच्या असमानतेला जर काही कारण असेल तर ते तुमचा आणि हिंदु धर्माचा असलेला लागाबांधा हे होय.

     या असमानतेच्या अन्यायात सांत्वन करण्याच्या हेतूने काही स्पृश्य लोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या, म्हणजे तुम्हाला शिवू ! तुम्ही स्वच्छ राहा म्हणजे तुम्हाला शिवू ! आणि समानतेने वागवू ! खरे म्हटले असता, अडानि महाराची दरिद्री महाराची आणि अस्वच्छ महाराची जी गत होते तीच गत शिकलेल्या महारांची, पैसैवाल्या महारांची आणि स्वच्छ राहणाऱ्या महारांची होते. हे तुम्हा आम्हा सर्वाना अनुभवाने माहीत आहे पण तो प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी जर शिक्षण घेतल्याशिवाय, हाती पैसा असल्या शिवाय, अंगावर पोशाख असल्या शिवाय, मान मान्यता मिळणार नाही तर साध्या महाराने काय करावे ? ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही, ज्याला पैसा मिळू शकत नाही आणि ज्याला निटनेटका पोशाख करता येत नाही त्या महाराला समानता कशी मिळणार ? खिस्ती धर्मात, मुसलमान धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या, धन, पोशाख, पराक्रम अशा बाहय वस्तूंशी मुळीच नाही माणसाचे मनुष्यत्व हीच महत्वाची गोष्ट आहे असे दोन्ही धर्म मानतात्त व ते मनुष्यत्व सर्वाना आदरणीय असणे पाहिजे. कोणी कोणाचा अपमान करू नये व कोणी कोणाला असमान मानू नये असे ते धर्म शिकवतात. हिंदु धर्मात या शिकवणीचा पूर्ण अभाव आहे. ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्वाला व त्याच्या माणुसकीला काही किमत नाही तो धर्म काय कामाचा ? आणि त्याला कवटाळून धरून राहाण्यात काय हासिल आहे ? याला उत्तर म्हणून काही हिंदू लोक उपनिषदाची साक्ष देतात त्यात ईश्वर सर्वत्र भरता आहे, असे तत्त्व आहे म्हणून बढाई मिरवतात. विज्ञान आणि धर्म या दोन गोष्टी अदा निरनिराळ्या आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे कि धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे. सर्वाभूती एक ईश्वर हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. धर्माच्या तत्वांचा वागणुकीशी संबंध असतो, विज्ञानाचा नसतो. सर्वाभूती एक ईश्वर हा धर्माची शिकवण नाही हवं विज्ञानाचे तत्त्व आहे हि गोष्ट, हिंदू लोक त्याप्रमाणे वागत नाहीत या माझा म्हणायाचा पुरावाच आहे. उलटपक्षी हिंदू लोकांचा असा आग्रहच असेल का सर्वाभूती एक परमेश्वर आहे. हि गोष्ट तत्त्वज्ञानाचा सिद्धांत नसून त्यांच्या धर्माचा पाया आहे आणि म्हणून त्यांचा धर्म श्रेष्ठ आहे. तर त्यांना एवढेच उत्तर पुरे आहे की त्यांच्या इतके नीच लोक जगामध्ये दसरे कोणीच नसतील मुखाने सर्वाभूती ईश्वर असा जप करणाऱ्या आणि कृतीने भूतमात्राची विडंबना करणाऱ्या लोकांचा 'मुख में राम बगल में बुरी' 'बोलणे महानुभावाचे पण करणी कसाबाची' अशा दुष्ट लोकातच समावेश करावा लागेल. सर्वाभूती एक ईश्वर मानणारे आणि आने माणसाला पशुतुल्य लेखणारे लोक दांभिक आहेत, त्यांचा संग करू नका. मुग्यांना साखर घालणारे व माणसांना पाण्यावाचून मारणारे लोक दांभिक आहेत त्यांचा संग करू नका! त्यांच्या संगामुळे तुमच्यावर काय परिणाम झाला आहे ? तुमचा इज्जत नाहीशी झाली, तुमचा मान सम्मान नाहीसा झाला. खरे म्हटले असता हिंदू समाजातच तुम्हाला मान सन्मान नाही, हे म्हणणे वस्तुस्थितीच्या मानाने अपुरे पडते. तुम्हाला हिंदू लोकच हलके मानतात असे नव्हे तर मुसलमान व खिस्ती लोक देखील तुम्हाला हलके लेखतात. खरे म्हटल असता मुसलमान धर्मात, खिस्ती धर्मात श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच असा भेदभाव जागृत करणारा शिकवण नाही असे असताना देखील हे लोक तुम्हाला कमी लेखतात. त्याचे कारण काय हे याचे कारण एकच. हिंदू लोक तुम्हाला नीच लेखतात म्हणूनच तुम्हाला मुसलमान व खिस्ती लोक नीच लेखतात. अस्पृश्याना जर आम्ही समान लेखले तर हिंदू लोक आपल्याला अस्पृश्याच्या इलकेच खालचे लेखतात. या भीतीमुळे मुसलमान ब खिस्ती लोक तुमच्याशी हिंदू प्रमाणेच अस्पृश्यता पाळतात. आम्ही हिंदू समाजात हिन गणले गेलो आहोत. हलकेच नव्हे तर हिंदूच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्हा सर्व हिंदुस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हिन गणले गेलो आहोत हा अपमानकारक परिस्थिती टाळण्याकरिता हा कलंक धुवून काढण्याकरिता नरदेहाचे चीज करण्याकरिता, ज़र काणता एखादा उपाय असेल तर तो एकच आहे व तो म्हणजे हिंदु धर्माचा व हिंदु समाजाचा त्याग करणे हाच होय.



Share on Twitter

You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209