वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास मिळणार या योजनेचा आधार !

गरजू विद्यार्थ्यांना संधी : ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटीसाठी योजना

    चंद्रपूर : पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे.

    बारावी उत्तीर्ण केलेल्या व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, तसेच व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मदत होणार आहे. इयत्ता बारावीनंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या; परंतु शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यासाठी योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

If OBC student not get admission in obc vastigruh than get the support of this scheme    बरेच विद्यार्थ्यांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

असे मिळते अर्थसाहाय्य

    मोठ्या शहरांसाठी भोजन भत्ता ३२ हजार, निवास २० हजार, उदर- निर्वाह भत्ता आठ हजार मिळतो. तर जिल्हापातळीवर भोजन २५ हजार, निवास १२ हजार तर उदरनिर्वाह सहा हजार अशाप्रकारे एकूण ४३ हजार रुपयांची मदत दिली जाते.

    नगरपरिषदेच्या क्षेत्रात भोजनभत्ता २८ हजार, निवास १५ हजार, उदर- निर्वाह आठ हजार रुपये देण्यात येतो.

विद्यार्थ्यांनो लगेच करा अर्ज

    ■ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षासाठी अर्जाची मुदत दि. २० जून ते १५ जुलै असून, निवड यादी १ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. गरजूंनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

    ■ या योजनेमुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळत असतो. त्यामुळे वेळीच विद्यार्थ्यांनी अर्ज करावा.

काय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ?

१ गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक साहाय्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

२ ओबीसी, एसबीसी व व्हीजे, एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

पात्र विद्यार्थ्यांना काय मिळणार ?

■ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना वार्षिक ६० हजार रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाते.

■ पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, गृहनिर्माण भत्ता, राहणीमान भत्ता, अशा विविध स्तरांवरील भत्ते दिले जातात.

■ या मध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना लाभ मिळत असून उच्च- शिक्षणासाठी मदत होत असते.

ही कागदपत्रे लागणार

     विद्यार्थी ओबीसी, व्हीजे, एनटी, एसबीसी प्रवर्गातील असावा, अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक कागदपत्रे असावीत.

कोठे करायचा अर्ज ?

■ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी शासनाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज सादर करावा लागतो.

■ माहिती भरून अर्ज सबमिट केल्यानंतर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यानुसार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होते.

■ अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करावे.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Savitri Mata Phule
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209