ओबीसी संघटनांचा एल्गार गोंदिया राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृह उभारण्याचे राज्य शासनाने जाहीर केले. मात्र अद्यापपर्यंत ओबीसीचे वसतीगृह उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली यामुळे ओबीसी नाही. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरी क्षेत्रात भटकती करावी लागते. यासाठी ओबीसी संघटनांनी एल्गार पुकारून त्वरित वसतीगृह सुरू करा, अन्यथा वसतीगृहासाठी भीक मागून शासनाला निधी पाठवू असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
सविस्तर असे की, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १०० मुले, व १०० मुली या मर्यादेत प्रति जिल्हा २०० याप्रमाणे ३६ जिल्ह्यांसाठी एकूण जिल्हानिहाय दोन याप्रमाणे ७२ वसतिगृहे कार्यान्वित करण्यास २८ फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली. मात्र त्याकरीता अद्यापही वित्त विभागाने निधी न दिल्याने वसतीगृह सुरु होण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्या अडचणी ८ दिवसात न सोडविल्यास ओबीसी संघटनाच्यावतीने राज्यभर येत्या १२ सप्टेंबरला भीक मांगो आंदोलन करुन शासनाच्या वित्त विभागाला निधी पाठवण्याचा इशारा ओबीसी अधिकार मंच व इतर ओबीसी संघटनाच्यावतीने आज जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांना व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ओबीसी मंत्र्याच्या नावे निवेदन सादर करुन देण्यात आले आहे. येत्या ११ सप्टेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास शासनाकडे ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी निधीची कमी आहे असे समजून १२ सप्टेंबर मंगळवार रोजी भीक मांगो सत्याग्रहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून भीक मागून शासनास मनीऑर्डर द्वारे शासनास निधी पाठण्यासाठी आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे. निवेदन देतेवेळी ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे, अशोक लंजे, ओबीसी संघर्ष समितीचे कैलास भेलावे, सविता बेदरकर, अतुल सतदेवे, सुनिल भोगांडे, शिशिर कटरे, चंद्रभान तरोणे, संतोष भेलावे, स्वानंद पारधी, जि.प. सदस्य पवन पटले, मिलिंद समरीत, हरीष मोटघरे, रवी सपाटे, सावन डोये, निखिल गजभिये, लिलाजी डहारे, प्रेमलाल गायधने, मुकेश भांडारकर, टेकराम बिसेन, प्रेमलाल साठवणे आदी ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.