पांढरकवडा : पांढरकवडा भारतीय पिछडा ओ.बी.सी. संघटना व ओ.बी.सी. जनमोर्चाच्या वतीने पांढरकवडा येथील विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. ओ.बी.सी. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओ.बी.सी. विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, नंदुरबार, धुळे आणि पालघर या जिल्ह्यांत ओ.बी.सी.चे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, प्रत्येक क्षेत्रामध्ये असलेला ओ.बी.सींंचा. बॅकलॉग हा भरला गेला पाहिजे, या मागणीकरिता ओ.बी.सी. बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर रायमल, विकास काळे, अशोक मोहुर्ले, प्रमोद राऊत, अजय ठाकरे उपस्थित होते. ओ.बी.सी.मध्ये असलेली जागृती देश मजबूत करण्याकरिता सहायभूत ठरेल, असे प्रतिपादन विलास काळे यांनी केले. या बैठकीचे आयोजन आतिश चव्हाण यांनी केले होते. संचालन सचिन बोंद्रे यांनी केले. यशस्वितेसाठी शालीग्राम राऊत, विनोद भांडेकर, नितीन टेकाम, श्रीकांत उईके, नगरसेवक बंटी जुवारे, मोरेश्वर डेहणकर आदी उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule