ओबीसी आरक्षणाचे राजकारण
OBC Aarakshan rajkaran
भारतातील बहुजन समाजातील एस.सी./एस.टी. / ओबीसी या वर्गातील समाजानेच जातीचा लढा दिला आहे. पुर्वी वर्ण, जाती असा काही प्रकार नव्हताच समानता-स्वातंत्र्य-न्याय-बंधुता-शांतता अशा मानवतादी तत्वावर आधारीत समाज व्यवस्था होती. तसेच आचरण होते. वैदीक आक्रमकासमोर ते उद्धवस्त झाले, महावीर गौतमबुद्ध, संत नामदेव, बसवेश्वर, संत तुकाराम, जिजाऊ, शिवराय, ज्योतीबा फुले, शाहु महाराज, बाबासाहेब आंबेडकर इत्यादिनी जातीसाठी समाज परीवर्तन केले. ब्रिटीशांचे राज्य आले. पेशवाई बुडाली ज्योतीबानी बहुजनांसाठी शिक्षणाची दारे उघडली. इंग्रज सरकारने ही उदारता दाखविली. शिक्षणासोबतच राज्य सत्तेचा मार्ग खुला करण्याची मागणी स्वीकारली 11 नोव्हेंबर 1917 रोजी बाळ गंगाधर टिळकांनी भाषणातुन सांगीतले की तेली, माळी, कुणबी, धनगर, शिंपी न्हावी, कोळी अशा जातीच्या लोकांना विधीमंडळात पाठवुन काय तेल काढायचे, शेती करायची नांगर हाकायचाय की केस भादरायचेत असा प्रश्न निर्माण करूण तेथे फक्त ब्राह्मण पाठवावे असा आग्रह धरला. जातीवरच मेरीट ठरवावे. हा अहंकार लोकमान्य टिळकांचा म्हणुन त्यांना पेशवाई पाहिजे होती. टिळकांच्या या जाती अहंकारावरच मेरीट व सत्ता हा विचार भातातच 15 ऑगष्ट 1947 रोजी राजसत्तेत अमलात आणला गेला इंग्रजांच्या गुलामगीरीतुन भारत देश स्वातंत्र्य झाल्यावर भारताचा पहिला प्रधानमंत्री कोण असावा याबाबत चर्चा चालु झाली. सरदार वल्लभभाई पटेल, आचार्य कृपलानी व पंडीत जवाहरलाल नेहरू ही नावे पुढे आली. लोकशाही राज्य सुरू होणार होते. कोणी माघार घेत नव्हते. पंधरा जणांच्या निवड मंडळांचे मतदान झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांना 12 मते अचार्य कृपलानी 3 मते आणि पंउीत नेहरू यांना शुन्य मत पडले. बहुमताने गुणवत्ता मेरीट सिद्ध करूणही भारताचे पहिले प्रधानमंत्री शुन्य मत मिळविणारे पंडीत जवाहरलाल नेहरू झाले. गुणवत्ता, जात, ब्राह्मण, पंडीत ही उपाधी नसुन पंडीत या शब्दाचा अर्थ काश्मीरी ब्राह्मण असा आहे. स्वतंत्र भारत देशात ओबीसी ची गुणवत्ता पायदळी तुडवून या देशाचा तिरंगा शुन्य मते पडणारे पंडीत जावहरलाल नेहरू यांनी फडकवीला जातीचा आधार पंडीत नेहरूनी घेतला परंतु स्वत: ओबीसी असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी नाही.