अज्ञानाचे बळी
Adnyanache Bali
अज्ञानाचे बळी - लेखक - प्रदीप चंद्रकांता गजानन ढोबळे, B.A., B.E., M.B.A., L.L.B
मी : आप आपल्याला आपल्या धर्माबद्दल तरी किती माहीती आहे ?
साळवी : मला आपल्या धर्माबद्दल पूर्ण माहीती आहे.
साळवी : महाभारत
मिसेसे साळवी : रामायण
राजेश : वेद
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे तो आपुले ।
देव तेथेची ओळखावा, साधू तेथेची जाणावा ॥
विज्ञानाच्या प्रगतीबरोबर मनुष्याचे बदलेले आचरण हाच त्याचा धर्म. आणी हे आचरण वा हा धर्म मनुष्याची आर्थीक परिस्थीती व नैतिकता ठरवित असते. आर्थीक परिस्थिती खुप चांगली असल्यामुळे चंगळवादी जीवन जगणारे हे अधार्मीक, तर गरीब असुनही एका पैशाचीही बेईमानी न करणारे जास्त धार्मीक धर्माची माझी ही अशी व्याख्या आहे.
साळवी : धर्माबद्दल तुमची ही व्याख्या, तर देवाबद्दलची काय आहे ?
मी : माझ्या दृष्टीने देव ही कल्पना आहे. जोपर्यंत ही कल्पना समाजहितासाठी राबत असेल तर त्यात काही आक्षेपार्ह नाही. परंतू जर ह्या कल्पनेच्या अस्तित्वातून कुणी पंडीत, भोळ्याभाबड्या लोकांची फसवणूक करीत असेल तर, हेही कल्पना नाकारण्याची आम्ही तयारी केली पाहजे.
प्रश्न : तुम्ही म्हणता देव नाही, मग आमच्या मनात, देवाची निर्मिती कशी होते ?
उत्तर : खरेतर जेव्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हा त्याच्या डोक्यात देवाची वगैरे कुठलीही कल्पना नसते. संस्कारातून देवाबद्दलची प्रतीमा आमच्या मनात निर्माण होत असते. तुम्हाला समजण्यासाठी एक प्रसंग सांगतो. एकदा आमच्या ऑफीसमध्ये मानसशास्त्र ह्या विषयावर व्याख्यान करण्याासाठी एक बाहेरचे प्रख्यात वक्ते येणार होते. ऑफीस मधील आम्ही सर्व सहकारी सभागृहात जमलो होतो. तेवढ्यात फोन आला की काही महत्वाच्या कारणामुळे प्रायोजीत वक्ता येणार नाही. मी माझ्या बॉसला म्हटले. मी देतो व्याख्यान मानसशास्त्रावर. आता ऑफीसमधील मंडळी माझ्या नित्याचीच ओळखीची. त्यांतील श्री. डिसुजा, श्री. शेख, श्री. कांबळे, श्री. देशमुख ह्या चार व्यक्तींना बोलविले. प्रत्येकाला एक कोरा कागद दिला. व म्हटले तुम्ही एका वाक्यात देवाबद्दल काहीतरी लिहा व कोरा कागदावर आपले नाव वा देवाचे नाव लिहु नका. मी वाक्य वाचूनच, कुणी काय लिहीले आहे, हे सांगेल. ठरल्याप्रमाणे सर्वांना कागद दिले. मी वाक्य वाचले व कोणते कुणाचे आहे हे सर्वासमक्ष 100 टक्के खरे सांगितले.
साळवी : आपण हे कसे करू शकला ?
मी : मी आधीच बोलविलेले लोक, ही चार वेगवेगळ्या धर्माची होती त्यामुळे, त्यांच्या मनात देव म्हणजे काय ? ह्याबाबतचे उत्तर त्यांच्या धर्मानुसार येणार होते. श्री. डिसुझा ह्यांच्या डोळ्यासमोर येशु होता. त्यांनी लिहीले होते, ‘देव, खूप दयाळू असतो.’ मुस्लीम धर्मीय शेखनी लिहीले होते, ‘देवाची रोज प्रार्थना केली पाहिजे.’ मुस्लीम लोक दिवसातुन 5 वेळ नमाज वाचतात, त्यामुळे हे वाक्य त्यानी लिहीले होत. श्री. कांबळे जे की बुध्द होते त्यांनी लिहीले होते, ‘करूणेचे दुसरे नाव म्हणणजेच देव.’ श्री. देशमुख जे की हिंदु होते, त्यांनी लिहीले होते. ‘देव मुर्तीत वास करतो.’ जर देव एकच आहे तर, देवाबद्दल त्यांच्या माहीतीत साम्य असायला पाहिजे होते परंतू ते वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे त्यांचे धार्मीक संस्कार भिन्न होते आणि म्हणूनच त्यांनी देवाबद्दल वेगवेगळी माहिती दिली. ह्याचाच अर्थ मनुष्याला ज्याप्रमाणे संस्कारीत केले गेले, त्याप्रमाणेच त्याची मानसिकता बनते. कमीतकमी देवाची कल्पना ही मानसिक संस्काराचा भाग आहे, एवढ तरी तुम्ही निश्चित मानाल.