नागपुर, उमरेड : शहरातील ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवारी (४ सप्टेंबर) पाठविण्यात आले. समाजबांधवांनी निवेदनात म्हटले की, ७२०० ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यांत ७२ वसतिगृहे सुरू करावी, स्वाधार योजनेच्या धर्तीवर आधार योजना सुरू करावी, परदेशी शिष्यवृत्ती योजनेत विद्यार्थिसंख्या वाढविण्यात यावी. या तिन्ही योजना एकाच वेळी सुरू कराव्यात त्या न केल्यास राज्यभरात भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यातून जमा झालेली भीक शासनाच्या वित्त विभागाला पाठविण्यात येईल. तसेच इतरही मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. येत्या १० सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास शासनाकडे निधीची कुठलीही उणीव नाही, असे समजून १२ सप्टेंबरपासून भीक मांगो आंदोलनाला सुरुवात होईल.