भीमा कोरेगाव मानवंदना करण्याकामी सरकारचे ढिसाळ नियोजना प्रकरणी भारत मुक्ती मोर्चाची महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या न्यायालयात धाव
उल्हासनगर : शिव फुले शाहू आंबेडकरांचा व पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणुन महाराष्ट्राची ओळख असताना इतीहासीक स्थानाकडे सरकारचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होताना दिसतं आहे. १ जानेवारी १८१८ हा शौर्य व विजयाचा गौरव दीन नियमीत पार पडावा म्हणून १ जानेवारी १९२७ ला कोरेगाव भीमा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट देऊन समस्त नागवंशी समाजासमोर आदर्श युक्त अशी प्रेरणा देऊन गेलेत तेव्हा पासून 'ते आजतागायत ही परंपरा चालु असुन दीवशे दिवस भीमा कोरेगाव येथे लाखोंचा जनसागर मानवंदना करण्यासाठी येत असतो. मात्र ज्यांच्या विरोधात भीमा कोरेगाव चां विजय स्थंभा स अभीवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटला जात आहे त्या लढवय्या स्वातंत्र्यसैनिकांच्या नागवंशीय अनुयायांना रोखण्यासाठी जातीवादी सरकारने २०१८ पासून वेगवेगळ्या क्लुप्त्या आखुन कधी दंगली घडवणे, तर कधी नियोजनाच्या ढिसाळ कारभारामुळे विजय स्थानाला भेट देऊन अभिवादन करणाऱ्या नागरिकांच्या गैरसोय करणे अशा अनेक व्यवहारप्रकरणी राष्ट्रीय स्तरावर भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने समस्त नागवंशी समाजाने सरकारवर आरोप करून जनतेच्या न्यायालयात धाव घेतली आहे.