चंद्रपूर, ता. ८ जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये यासाठी ओबीसी जनगणना संकल्प यात्रेला सेवाग्राम येथून सुरूवात झाली. ही यात्रा आज ब्रह्मपुरीत दाखल झाली आहे. येत्या १२ फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात येणार आहे. जिल्ह्यात यात्रेचे स्वागत करण्यासाठी ओबीसी सेवा संघतर्फे सकल ओबीसी समाजाची बैठक पार पडली.
दीक्षाभूमी येथे यात्रेचा समारोप होईल. यात्रा नियोजन करण्यासाठी धनोजे कुणबी समाज मंदिरात पार पडलेल्या बैठकीला अध्यक्ष सूर्यकांत खनके, अॅड. सातपुते, नंदू नागरकर, प्रा. अनिल डहाके, हिराचंद बोरकुटे, लक्ष्मणराव धोबे, विजयराव टोंगे, संदीप गिर्हे, प्रा. नरेंद्र बोबडे, सुनील मुसळे, डॉ. कांबळे, अनिल शिंदे, अवधूत कोठेवार, विलास माथानकर, प्रा. सुरेश विधाते यांच्यासह अन्य जणांची उपस्थिती होती.