जत दि.८ जानेवारी २०२४ - लोणारी समाजाचे नेते स्व. विष्णुपंत दादरे साहेब यांची जयंती जत येथे साजरी करण्यात आली.. यावेळी लोणारी,ओबीसी, बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसी नेते तुकाराम माळी यांनी विष्णुपंत दादरे साहेब यांच्या कार्याची माहिती सांगताना म्हणाले की
विष्णूपंत दादरे(दादा) यांचा जन्म शिरपूर जि.धुळे येथे अत्यंत गरीब कष्टकरी परंतू उमद्या विचारांच्या कुटूंबात दि.८जानेवारी १९३३ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नांव रामचंद्र तर आईचे नांव सीताबाई असे होते. आई वडीलांचे शिक्षण झाले नसले तरी धार्मिक वृत्तीचे संस्कारी होते. त्यांना शिक्षणाच्या विषयी तळमळ आणि आवड होती. रामचंद्र सीताबाई यांना मुले व मुली सहा होते. घरची गरीब परिस्थितीतून रामचंद्र गवंडी काम करत असत.पुढे गवंडी काम मिळेनासे झाल्यानंतर कोळसा व चूना तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय करू लागले होते.काबाडकष्ट व दुर्गम जंगलातील रहिवास यामुळे वडीलांचा जंगलातील जंतू संसर्गजन्य आजाराने निधन झाले. विष्णुपंत लहान असतानाच वडील म्हणजे नाना कुटूंबाला सोडून गेल्याने दादा पोरके झाले. वडिलांच्या निधना समयी तिसरीत शिकत होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर आई थोरली बहिण आणून मेव्हणे यांच्या आग्रहा मुळे जळगाव तालुका मालेगांव येथे राहण्यासाठी गेल्या आणि त्या ठिकाणी स्वतंत्र राहून मोल मजूरी करून उदरनिर्वाह करू लागले. विष्णुपंत यांचे काका म्हादू यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे विष्णुपंत शिरपूर येथे काकांच्या कडे राहून शिक्षण घेतले आणि १९४९ साली सातवी पास होऊन म्युनिसिपल हायस्कूलमध्ये आठवीत प्रवेश घेतला. त्या काळत हास्कूल शिक्षणासाठी फी माफी नव्हती त्यामुळे फी माफीसाठी विष्णुपंत यांना विनंती अर्ज केल्यानंतर फी माफी होत.अशाप्रकारचे विष्णुपंताचे शिक्षण काबाडकष्ट करीत चुलते कधी आत्या कधी मित्र कधी प्राचार्य यांच्या सहकार्याने झाले.ते अशा खडतर परिस्थितीतून मॅट्रीक पास झाले.हालाक्यात,उपासमारीत ते मैट्रिक परीक्षा पास झाले. मॅट्रीक परीक्षा पास झाल्यानंतर ते नाशिकला आत्यांचेकडे राहण्यासाठी गेले.नाशिक येथे त्यांना वायरमन वायरलेस टेलीग्राफ हे प्रशिक्षण पूर्ण केले.नंतर टेलिफोन खात्यात नोकरीसाठी रीतसर प्रयत्न केला परंतु त्यांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे विष्णुपंत नाशिकहून कामधंदा करण्यासाठी मुंबईला आले. मुंबईत विष्णुपंत मोलमजुरी करून हाताने स्वयंपाक करुन राहू लागले. सुरत येथील साळीराम शंकर हळकर यांची कन्या इंदुमती हिच्याशी १९५५ साली विवाह झाला त्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळून विष्णुपंत १५ जून १९५५ रोजी टेलिफोन खात्यात अवघ्या दरमहा ९२ रु.पगाराच्या नोकरीस लागले विष्णुपंताना वाचनाची आवड होती. ते महात्मा जोतिबा फुले, आंबेडकर यांची पुस्तके वाचत.
दादांच्या या महान समाज कार्यासाठी समाज बांधवांनी त्यांच्या जयंती निमित्य विनम्र आदरांजली वाहिली यावेळी आण्णासाहेब हारगे, मल्लू औरसंगे,शिवाजी क्षीरसागर, रविंद्र सोलनकर, भारत क्षीरसागर, संतोष खिलारे,सौ.कमलाताई हारगे,नितीन नरळे,शर्मिला मुंजे,पांडूरंग पाटील, सुयोग मुंजे,अमोल बाबर आदि मान्यवर उपस्थित होते.