मुख्य मजकूराकडे जा

अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन, पुणे (२००६) अध्यक्षीय भाषण

Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan

Page 6 of 11
23 ऑगस्ट 2021
Book
5,4,1,2,3,,

चार वर्णांच्या चार भिंती -
 

    चार वर्णाच्या चार भिंती पूर्णतः जमीनदोस्त करायच्या की त्यांची डागडुजी करायची? परंतु आजही भिंती जमीनदोस्त झालेल्या नाहीत. कारण आतून त्यातील विषमतेचे पोलाद मजबूत आहे. ज्ञानकोशकार केतकर तर स्पष्टपणे सांगतात की, चार्तुवर्ण्य संरक्षण हा आपला धर्म होय. (म. ज्ञा. प्रस्तावना खंड - भाग १ पृष्ठ - ४३६). -  

    वर्ण व्यवस्थेच्या अमानवी व्यवहारामुळे हिंदु समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणावर धर्मांतरे घडूनही आजचा आमचा धर्मज्ञ हिन्द किंवा हिंदुत्त्वांचे केन्द्रपुरुष जाती-अंधश्रद्धा विरहित हिंदुत्व अमलात आणायला तयार नाहीत ना बाबांनो. स्वा. सावरकरांनी असा प्रयत्न करून पहिला, पण त्यांनाही नंतर सनातनवाद्यांनी गंडाळून टाकले; तेही मनुवाद्यांसमोर नरमले. पर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारताच वीर सावरकारांना ते, नाही. या धर्मांतर विरोधात त्यांनी ३१-१०-५६ च्या कसरा त लेख लिन डॉ. आंबेडकरांच्या धर्मातराचे कौतूक नको' असा इशारा दिला. सावर मत बौद्धजन हे पितृभूमीचेच धर्म पंथ आहेत. तर मग हा आक्षेप त्यांनी घ्यावा? उलट त्यांनी बाबासाहेबांचा गौरवच करायला हवा होता. का त्यानी इतर दुसरा धर्म स्वीकारला असता तर...

      Akhil Bharatiya other backward class (OBC) Sahitya Sammelan धम्मचक्र परिवर्तनाच्या ऐतिहासिक सिद्धीसाठी प. पू. डॉ. बाबासाह आबेडकर १२ ऑक्टोबर १९५६ ला नागपूरात आले असता त्यांची भेट ५. माडखोलकर यांनी घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. चर्चत मान बाबासाहेबांना म्हणाले की आपल्या धम्म परिवर्तन क्रांतीला 'भीमयान म्हणायला काय हरकत आहे? यावर बाबासाहेबांचे हसून उत्तर असे, "तम्हाला वाटल्यास तुम्ही म्हणा, पण मी म्हणणार नाही. मी जगाला काही नवीन विचार दिला नाही. मी एवढेच समजतो, की जे धम्मचक्र या देशात हजार वर्षे स्थगित होऊन गेलेले होते ते पुन्हा प्रवर्तित करण्याचे भाग्य लाभले. तुम्ही हिंदूंनी आपल्या आत्मघातकी वृत्तीमुळे ख्रिस्ती आणि इस्ला धर्म या देशात येऊ दिले आणि वाढूही दिले. इतके की त्यामुळे अखेर देशाचे तुकडे पडण्याची पाळी आली. उलट बौद्ध धर्मासारखा जो अत्यंत तर्कशुद्ध असा श्रेष्ठ धर्म या भूमीत उदयाला आला, त्या भारतीय धर्माला मात्र तुम्ही देशोधडीला लावले.” १९३४ मध्ये डॉ. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यावर १९३६ साली लाहोर येथे 'जातीपाती तोडो' मंडलच्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनपर भाषणात बाबासाहेब म्हणतात, “मुसलमानों के आक्रमण के पहले हिंदु यह शब्द किसी भी संस्कृत ग्रंथ में नही मिलता। इसलिये हिंदु समाज जैसी कोई चीज नही रही है, यह तो जातियों का जमावडा मात्र है; हर जाती यहा अपनी पहचान के बारे मे सजग है। उसका अपना अस्तित्वही हर चीज की सुरुवात और हर चीज का अंत है। जातीया से मिलकर एक महासंघ भी नही बनता है । हिंद-मुसलमान दगे का एक अपवाद छोड़कर यहा दो जातीयों में जुडाव की भावना नही उभरती।' (धर्मयुग - १५ एपिल १९९०) यावरून काय बोध घ्यायचा तो घ्या, 

Book Pages

Page 6 of 11