नारायणगाव : धर्माच्या झुंडीपासून मानवतेला धोका आहे, धर्माच्या नावावर अधर्म जोर धरत आहे त्यामुळे सामाजिक दुफळी निर्माण होऊन माणसं एकमेकांपासून दुरावून विषमतेची दरी वाढत असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांनी व्यक्त केले, डोंबिवली येथे 2 र्या पी,सावळाराम साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते,साहित्याचा केंद्रबिंदू हा माणूस असला पाहिजे, जाती धर्माच्या पलीकडे वैश्विक तत्वज्ञानच जगाला पुन्हा समता व शांतता देऊ शकेल असे मत गोरे यांनी या प्रसगी मांडले,साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीतून एकसंध समाजासाठी लिखाण करणे आवश्यक आहे,तरच साहित्याला दुदैर्वाने विचारशुन्यतेचे लागलेले ग्रहण दूर होईल व विश्वशांती पुन्हा नव्याने उदयास येईल असा आशावाद हि गोरे यांनी या प्रंसगी व्यक्त केले,