सांगलीत सर्वपक्षीय ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक
सांगली - पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण महत्वाचे आहे. त्यामुळे इंपरिकल डेटा गोळा करून ओबीसीना न्याय हवा आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना सर्वपक्षीय ओबीसी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय निवडणूक घेवू नये, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी केली.
बैठकीस अमर पडळकर, विष्णू माने, माजी महापौर संगीताताई खोत, निवांत कोळेकर, दीपक माने, आसिफ बावा, अशरफ वांकर, अभिजीत तुराई, सुरेश टेंगले, बादशाह पाथरवट, बाळासाहेब गुरव, शशिकांत गायकवाड, डॉ. विवेक गुरव, संजय विभुते, विठ्ठल खोत, नंदकिशोर नीलकंठ, अरुण खरमाटे, हरिदास लेंगरे, बिपीन कदम, गजानन मगदूम, गजानन आलदर, तुकाराम माळी, सम्राट माने, परशुराम माळी, बाळ नाना चव्हाण, अल्लाबक्ष मुल्ला, उमर गवंडी आदी उपस्थित होते.